मुकाई मित्र मंडळ आणि प्रशांत दादा भागवत यांचा ‘इंद्रायणी माई’साठी अनोखा उपक्रम
इंदोरी – गणपती उत्सव हा आनंद, श्रद्धा आणि भक्तीचा सण असला तरी, विसर्जनानंतर घाटांची होणारी दयनीय अवस्था अनेकदा विषण्ण करणारी असते. निर्माल्याचे ढीग, नदीकाठी पडलेल्या मूर्ती आणि पसरलेली दुर्गंधी यामुळे धार्मिक कार्याला गालबोट लागते, ही बाब मनाला चटका लावणारी आहे. हीच वेदना लक्षात घेऊन, पर्यावरणप्रेमी प्रशांत दादा भागवत आणि मुकाई मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या पंधरा…
